Spread the love जिल्हा नियोजन समिती बैठकीत अनेक विषयांना घातला हात बीड: अहिल्यानगर – परळी रेल्वेमार्गातील बीडपर्यंतचे काम पुर्ण झाले असून पुढचे कामही गतीने सुरू आहे. आता यापुढे बीडला विकासाच्या दिशेने घेवून जाण्यासाठी आणखी एक येडशी-सोलापूर हा नवीन रेल्वेमार्ग मंजूर होणे गरजेचे आहे. याच बरोबर मांजरसुंबा येथे विमानतळाची जागा निश्चित करून त्यासाठी राज्यशासनाकडून मदत मिळावी, असा ठराव खा.बजरंग सोनवणे यांनी मांडला. यास पालकमंत्री ना. अजीत पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या दोन्ही महत्वाच्या विषयाला आपण मदत करू, असे म्हटले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या हॉलमध्ये आयोजित बैठकीत बोलताना खा.बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यातील अनेक विषयावर चर्चा केली. खासदार म्हणून रेल्वे आणि विमानतळ या विषयावर त्यांनी तळमळीने विषयाची मांडणी केली. यावेळी ते म्हणाले, बीडला रेल्वे यावी, हे बीडकरांचे अनेक वर्षाचे स्वप्न आता पुर्ण होत आहे. यासाठी अनेकांचे योगदान आहे. काही दिवसात बीडपर्यंत रेल्वे धावत आहे. बीड ते अहिल्यानंतर अशी रेल्वे सुरू देखील होईल. बीड ते परळी रेल्वे मार्गाचे काम किती कालावधीत पुर्ण करणार, याचे रेल्वे अधिकाऱ्यांना टप्पे पाडून दिले आहेत. ते पुढील कामही गतीने करत आहेत. दरम्यान, अहिल्यानंतर परळी रेल्वेमार्गाबरोबरच बीडच्या विकासासाठी महत्वाचा असलेला येडशी-जालना हा रेल्वेमार्ग देखील महत्वाचा आहे. हा मार्ग केवळ १८० किलोमिटरचा असून तो मंजूर झाला तर या रेल्वेमार्गामुळे बीडचा झपाट्याने विकास होईल, अशी मागणी केली. यानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजीत पवार यांनी या विषयाकडे सकारात्मकतेने बघत या मार्गासाठी आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकार करेल, असा शब्द दिला. तर बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना खा.सोनवणे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री व्हावेत, अशी मी अपेक्षा सुरूवातीला व्यक्त केली होती. त्यांनी आज नियोजन समितीची पहिली बैठक शिस्तीत घेतली. मी डीपीसीच्या अनेक बैठकी सदस्य म्हणून पाहिल्या पण २२ वर्षाच्या काळात नियमाप्रमाणे बैठक कशी असावी, हे आज पहायला मिळाले. त्यांनी बैठकी आगोदर जिल्ह्याचा आढावा देखील घेतला. ज्या प्रशासकिय मान्यता द्यायच्या असतात. त्या टप्प्या टप्प्याने द्यायच्या असतात, परंतु मागील पालकमंत्र्याचे पीए आणि त्यांच्या माणसांनी, जिल्हाधिकारी, सीईओ यांनी चुकीच्या पध्दतीने मंजुरी दिल्या. आराखड्यात मंजूर नसताना प्रशासकिय मान्यता दिल्या. मी जेव्हा विमानतळाचा विषय मांडला तेव्हा लोक हसले होते, पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळासाठी पैसे देतो, असे सांगितले. बीड येथे विमानतळ मंजुर करण्यासाठी व धाराशीव – जालना या शहरांना रेल्वे ने जोडण्यासाठी येडशी ते जालना असा नवीन रेलमार्ग मंजुरीसाठी खासदार म्हणुन आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही खा. बजरंग सोनवणे यांनी दिली. अतिरिक्त पदभार काढण्यावर चर्चाबीड जिल्ह्यात फिरून फिरून तेच ते अधिकारी येतात. काहीच लोकांना अतिरिक्त पदभार दिले जातात आणि हे पदभार दिलेले अधिकारी कार्यकर्त्यांची भुमिका निभावतात. परिणामी, सामान्य माणसांचे कामे अडून पडतात, त्यांना सतावले जाते. यामुळे जिल्ह्यातील लाडके अधिकारी आणि त्यांच्याकडे असलेले पदभार काढून त्यांना यातून मुक्त करावे, अशी मागणीही केली.मुंडेंना दिले तडाखेबाज उत्तरमाजी पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांवर दहशत, बीडचा बिहार, बीडची बदनामीचा उल्लेख केल्यानंतर खा.बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यात कोणीची दहशत आहे, बीडची बदनामी कोण करत आहे, असे तुम्हीच सांगावे. याठिकाणी आमची कोणाची दहशत असण्याचे कारण नाही. बीडमध्ये वाळूचे धंदे कोणाचे आहेत. आम्ही मर्डर करतोय का?, आम्ही चोऱ्या करतोय का?, राखेचा धंदा कोण करतेय?, आम्ही खंडणी मागतोय का?, आम्ही गुटखा, मटका चालवत आहोत का.?, आम्ही संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी न्याय मागत आहोत आणि न्याय मागणे याला आपण दहशत कसे म्हणता, असे तडाखेबाज उत्तर दिले. Post Views: 5 Post navigation Rotary Club of Poona to organize ‘The Ultimate Move-a-Thon’ on February 9 !! पुण्यात होणार १५ मार्च २०२५ ला बिगर हुंडा भव्य सामूहिक विवाह सोहळा